Labels

Friend (11) mudhoji (11) phaltan (11) reunion (11) school (11)

Friday, July 31, 2015

MHS किस्सा - 5 : मित्राचे पत्र - पत्रात मित्र

तुम्हाला आठवते आहे का - तुम्हाला शेवटचा email किंवा पत्र कधी आले होते ?
नाही आठवत ना पण मलाही नाही. शाळेत पत्रालेखन केले पण त्यानंतर नाही.

आता पत्रे येतात ती… Bank, Insurance, किंवा कुठल्यातरी company ची।
       पण आपल्यांची पत्रे कशी असतात ते विसरलोच. आधी email किंवा SMS तरी पाठवायचे एकमेकांना पण आता तेही नाही.

आता याच गेट-टु मुळे मला एक पत्र आले बघातर कुणाचे आहे ते…


* ता. क. : आज मला नाही वाटत की पत्रात कुठे जागा मिळेल कंसातून डोकवायला, बघतो प्रयत्न करून *

प्रिय अभिजीत,

माझ्याकडे मराठी font नाही आणी मला इतक्या fast मराठीतुन type करताही येत नाही. 
So please consider it.
तुला एक किस्सा सांगायचा आहे - आपल्या गेत्टू विषयी.


तारीख 28/05/15 रात्री 9.45 ची.मी पुण्यावरून फलटणला जात होतो, गाडी चालवतच होतो आणी तेवढ्यात फोन वाजला.

बघतोतर Number निलेशचा. 
(निलेश भोईटे : या व्यक्तिमत्व बद्दल सांगायचे तर group वर आणि सामोरुन सुद्धा कमी बोलणारा, याची खूण म्हणजे मधूनच स्मितहास्य देणारा)

आमचे संभाषण  झाले :
मी: - बोल अण्णा !!
निलेश: - तुझा फोन का बंद आहे दोन दिवसापासून ? 
(hi -hello ची भानगड मैत्रीत सापडणे कठीणच वाटते)
मी: - मग आपण कशावर बोलतोय ? 
(आता याची कुठली रास म्हणायची काय माहित ? बिचारा पलीकडून प्रश्न विचारतोय आणि उत्तर न देता - उलटा प्रश्न विचारला. )
निलेश: - तस नाही - WhatsApp  बंद आहे का ? उत्तर कोण देणारबे!
मी: - लग्नात व्यस्त होतो त्यामुळे फक्त बद ठेवला होता.  स्मार्टफोनच्या  battery ची बोंबच आहेना बाबा। काही विशेष? बोल की…

निलेश: - अरे  योगेश ने Group बनवला आहे वर्गातल्या मित्र-मैत्रीणांचा WhatsApp वर, तुलाही Add केले आहे त्याने. 
(इथे निलेश म्हणा किंवा याने म्हणा; मला नाही  वाटत एवढे स्पष्ट आणि पूर्ण नाव घेतले असेल योगेश चे)
मी: -. बघतो घरी जाऊन -रस्त्यात आहे…. 

पुढचे बोलणार तेवढ्यात फोनच्या battery ने दगा दिला :(
आता घरी जाई पर्यंत काही कळणार नव्हते मला.

घरी गेल्यावर पहिला phone charging ला लावला आणि fresh होऊन जेवायला बसताना net on केला. 
(आता इथुनपुढे ह्याची मंडळी जोश मध्ये आल्याशिवाय राहणार नव्हती - जेवा कि निवांत झाले चालू फोन वरती. असा पक्का काहीतरी dialogue पडला असणार

आता mobile चे जेवण (charging) झाल्यामुळे तोपण जोमात आला होता, पहिले एक - दोन आवाज आले व्यवस्थित पण नंतर अर्धी ringtone वाजून नुसती light दिसत होती, बघतोय तर १२७८ messages.
(मला वाटतंय थापा टाकतोय, आत त्याच्या फोनची history कोण check करणार आहे)

बायको म्हणाली घरातल्या सगळ्यांचे messages तुमच्या mobile वर divert करून घेतले का?
इतके messages आणि नवीन group बद्दल उत्सुकता यामुळे रात्री काही झोप नाही लागली मला. 
मग सगळी रात्र messages वाचण्यात आणि ज्यांचे number माझ्याकडे नव्हते त्यांचे profile photo बघुन contact save करण्यात गेली. आता अजुन असे बरेचजण असे होते ज्यांची ओळख पटली नव्हती.

सकाळी कुणाचे message नव्हते मला वाटले नवीन group असल्यामुळे आता तिसऱ्या दिवशी पुर उतरला असेल. आणि आलाना राव तेवढ्यात good morning चा message. 
(पहिले तर याला घाबरल्यासारखे झाले असेल डोक्यात विचार येताच mobile मध्ये message आलाना)
 मी good morning चा message टाकुन reply केला आणि झाली पुन्हा messages ला सुरवात. 
पहिला mobile charging ला लावला.
(याला म्हणतात हात दाखवुन अवलक्षण - मलातर आता हसून हसून डोळ्यात पाणी आले बाबा या किस्स्याने)

त्यानंतर योगेशचा phone आला - कुठे आहे म्हणल्यावर ? 
नेहमीचे बेकारीवर आहे असे सांगितलं मग येतो म्हणाला निवांत बोलायला संद्याकाळी. 
(आता मला सांगा नवीन group त्यातुन एवढे messages आणि योगेश चा phone…. तुम्हाला तरी खर वाटते आहे का की हे संभाषण बिना BIP च्या पूर्ण झाले असेल)

संद्याकाळी योगेश आल्यावर सगळ्या गोष्टी clear झाल्या. 
आपल्या शाळेच्या group चा गेत्टू करायचा म्हणत होता.
मी लगेच होकार दिला - का-कुठे-कधी असले प्रश्न विचार मनात आलाच नाही. कारण इतक्या वर्षांनी आपण कुणा कुणाला भेटणार त्याचा विचार डोक्यात येत होता. 
शाळेच्या जवळ असल्यामुळे बरेचजण यायचे लहान असताना आणि तशीपण आपली जागा गावाच्यामाध्येच कुणीनाकुणी भेटत असतेच किंवा दिसते. 
(आता इथे भेटला आम्हाला बिर्याणी शिजवणार - एकट्याने थोडी बनते बिर्याणी चांगली - आणि एकटी खाण्यात पण मज्जा नाही, हा आता पुढे जाऊन बनला फलटण चा monitor)

आणि आता regular chatting सुरु झाली WhatsApp वर आणि नवीन ओळखी होत गेल्या. एके दिवशी ठराव मान्य झाला - २६ जुलै ला शिक्का मारला. (आणि एकमतानी विजयी झाले - शक्यच नव्हते ७० लोक म्हंटल्यावर)

पण शेवटी २६ जुलैला तुम्हाच्याशी सामोरासामोर भेट झाली. 
मला यायला थोडा उशीरच झाला पण तुमच्या सर्वांचे degree आणि job details सांगताना आलो होतो. पण सगळे एकूण चांगले वाटले. 

सलीम त्यावेळेस कुठल्यातरी वर्षाचे calculations सांगत होता.  :P 

उशिरा आल्यामुळे माझा intro राहिलाच, तशी त्याची गरज आहे का?
नाव : साईप्रसाद फुले
शिक्षण : १० पर्यंत - मुधोजी; ११-१२ - Y.C.; Diploma in Bakery & Confectionery from Maharashtra Institute of Hotel Management & Catering Technology, Pune. 

ज्यांच्याशी शाळेत कधी बोललो नाही त्यांच्याशी गप्पा रंगल्या - सगळ्यांनी आपुलकीने चौकशी केली…. 
खरच खूपच छान गेले ४-५ तास रोजच्यापेक्षा कितीतरी वेगळे… 
मस्त। एकदम refreshing वाटले. 
खरच खूप सुंदर झाला प्रोग्राम आपल्या गेट-टु चा… !

जे सुचले ते लिहून पाठवतोय हवे तेव्हा तक blog वर. :)

- साई. 




छान वाटलेना बऱ्याच दिवसांनी email किंवा पत्र वाचून. 
वाटणारच… आपल्या मित्राचे आहेना. 

असेच भेटत राहा। पत्र पाठवत राहा …. 

अरे पुन्हा विसरलो… आलाय काय प्रश्नांचे उत्तर… 


……………………………… वाचाल तर वाचाल …… काय पुढील ब्लॉग ;)



                                                                           >>>> MHS किस्सा - 7: Coming सून

9 comments:

  1. Sai good one
    and as usual very well explained by AbhiJEET...........

    ReplyDelete
  2. SAI VERY GOOD........
    निलेश: - तुझा फोन का बंद आहे दोन दिवसापासून ?
    (hi -hello ची भानगड मैत्रीत सापडणे कठीणच वाटते)
    मी: - मग आपण कशावर बोलतोय ?


    ReplyDelete
  3. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  4. Lai bhari sai n kansatala abhi..mast

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete